Wednesday, 5 August 2015
Tuesday, 4 August 2015
Monday, 3 August 2015
Saturday, 1 August 2015
Thursday, 30 July 2015
गुरु ~ गुरुपोर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा ||
#गुरु
गुरु भक्तांची माऊली
तप्त उन्हात ती सावली
अनुग्रहे करतात पावन
धरावे तयांचे चरण
गुरु भक्तांची माऊली
तप्त उन्हात ती सावली
अनुग्रहे करतात पावन
धरावे तयांचे चरण
संकटात तारुनी नेतात
दासावरी पाखर घालतात
सुखकर्ता दु:खहर्ता
तोची सर्व कर्ता करविता
अशांती घालवून टाकी
गुरू माझा माझी लाज राखी
"स्मरण" ठेवुन जो स्मरण करी
तो त्यासीच उद्धरी
शब्दांची रत्ने ओसंडती
नुरे सहवासाने
भिती सत्संग करुनी सांगे सार
देई सदा सद्विचार
प्रारब्ध जरी दृढतर
करी सद्गुरु सकळ दूर
ऎशा सांगे गुजगोष्टी
सुखी होती दिन कष्टी
-मनोम
दासावरी पाखर घालतात
सुखकर्ता दु:खहर्ता
तोची सर्व कर्ता करविता
अशांती घालवून टाकी
गुरू माझा माझी लाज राखी
"स्मरण" ठेवुन जो स्मरण करी
तो त्यासीच उद्धरी
शब्दांची रत्ने ओसंडती
नुरे सहवासाने
भिती सत्संग करुनी सांगे सार
देई सदा सद्विचार
प्रारब्ध जरी दृढतर
करी सद्गुरु सकळ दूर
ऎशा सांगे गुजगोष्टी
सुखी होती दिन कष्टी
-मनोम
Wednesday, 29 July 2015
फुलराणी......
फुलराणी......
तिच्या गो-यापान हातावर
मेंदी कशी खुलून यायची
त्यात ती येताना ओठांवर
जास्वंद चुरडून यायची
ती हसताना प्राजक्तं सांडायची,
अंगभर चाफा लावून यायची
बोलताना ओठ मुडपायची, इकडे
माझ्या कानाची पाळी लाल व्हायची
काळ्याभोर शेपट्यावर कधी मोगरा,
कधी अबोली माळून यायची
मंद वारा जरी स्पर्शला तिला
तरी ती अत्तराची कुपी होउन जायची
चुकून किंवा मुद्दाम, जरा झाला स्पर्श,
ती लाजाळूचं झाड व्हायची
तिचे मेंदीचे हात हातात घेतले की
ती माझी वेल व्हायची
जयंत विद्वांस
तिच्या गो-यापान हातावर
मेंदी कशी खुलून यायची
त्यात ती येताना ओठांवर
जास्वंद चुरडून यायची
ती हसताना प्राजक्तं सांडायची,
अंगभर चाफा लावून यायची
बोलताना ओठ मुडपायची, इकडे
माझ्या कानाची पाळी लाल व्हायची
काळ्याभोर शेपट्यावर कधी मोगरा,
कधी अबोली माळून यायची
मंद वारा जरी स्पर्शला तिला
तरी ती अत्तराची कुपी होउन जायची
चुकून किंवा मुद्दाम, जरा झाला स्पर्श,
ती लाजाळूचं झाड व्हायची
तिचे मेंदीचे हात हातात घेतले की
ती माझी वेल व्हायची
जयंत विद्वांस
Monday, 27 July 2015
डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन
भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. शिलाँग येथील आयआयएममध्ये व्याख्यान देत असताना अब्दुल कलाम अचानक व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर कलाम यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रात्री पावणे आठच्या सुमारास कलाम यांनी अखेरचा श्वास घेतला.
कुणी जातो हज, कुणी काशीला !
जनमनांस लावुनी चटका,
पुण्यात्मा गेला एकादशीला....
कुणी जातो हज, कुणी काशीला !
जनमनांस लावुनी चटका,
पुण्यात्मा गेला एकादशीला....
आषाढी एकादशी
#आषाढी #एकादशी
पंढरीच्या #पांडुरंगा.......!
बळीराज्यावरच हे आलेले दुष्काळाच
संखट दुर कर येवढीच
पांडुरंगा तुझ्याचरणी प्रार्थना...
पंढरीच्या #पांडुरंगा.......!
बळीराज्यावरच हे आलेले दुष्काळाच
संखट दुर कर येवढीच
पांडुरंगा तुझ्याचरणी प्रार्थना...
Thursday, 23 July 2015
Wednesday, 22 July 2015
लावणी
आपल्या मराठी कविता ब्लॉग च्या वाचक सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे यांची अतिशय सुंदर लावणी ! कृपया आपला अभिप्राय कळवा.
लावणी
लावणी
राया माझा पदर सोडा लावून देते विडा
मागे मागे करू नका द्या हो कात केवडा
माझे रूपडं हो सोन बावनकशी
भरली उभारी हो भरली पेर जशी
नका सतावू जाऊ द्या ना
नुकतच सरली सोळा
पदर सावरते परी ढळतो कसा
केस आवरते तरी सुटतो कसा
तुम्हास बघते दारा आडून धीर करून गोळा
तुम्ही याव म्हणून रोज भिजते ऊशी
तुम्ही दिसलात की होते वेडी
पिशी तुमच्यासाठी सजते श्रृंगार करून सोळा
-- सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मागे मागे करू नका द्या हो कात केवडा
माझे रूपडं हो सोन बावनकशी
भरली उभारी हो भरली पेर जशी
नका सतावू जाऊ द्या ना
नुकतच सरली सोळा
पदर सावरते परी ढळतो कसा
केस आवरते तरी सुटतो कसा
तुम्हास बघते दारा आडून धीर करून गोळा
तुम्ही याव म्हणून रोज भिजते ऊशी
तुम्ही दिसलात की होते वेडी
पिशी तुमच्यासाठी सजते श्रृंगार करून सोळा
-- सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
Tuesday, 21 July 2015
Monday, 20 July 2015
Sunday, 19 July 2015
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर
अवचित कधी सामोरे यावे
अन् श्वासांनी थांबून जावे
परस्परांना त्रास तरीही परस्परांविण ना गत्यंतर
मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्तर
भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर
मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मी अन् तूही मजला सावर सावर
मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर
- संदीप खरे
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर
अवचित कधी सामोरे यावे
अन् श्वासांनी थांबून जावे
परस्परांना त्रास तरीही परस्परांविण ना गत्यंतर
मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्तर
भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर
मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मी अन् तूही मजला सावर सावर
मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर
- संदीप खरे
Thursday, 16 July 2015
Thursday, 9 July 2015
पप्पा
पप्पा
असतील जगात जन्मदाते कित्येक
पप्पा माझे आहेत लाखात एक
न भेद केला कधी मुला मुलीचा
प्रत्येक भाव जाणिला माझ्या मनिचा
सवंगडी म्हणुनी मजसवे खेळले
सखिसारखे हितगुज ग केले
जीवनी खचले मी कित्येक वेळा
जवळी मज केले म्हणुनी
बाळा
जेव्हा मज संकटांनी घेरले
जावुनि त्यांच्या कुशीत निजले
दिला मग तेव्हा त्यानी उबारा
दुसरा काय पिल्लाला हवा आसरा
पिल्लू ग मी त्यांचे चिमुकले
पंखांखाली मायेच्या भय सम्पले
म्हणतात मज आता ते मार भरारी
सोडूनि कसे जावे शल्य हेच उरी
घरट्याकडे नजर जाई वेळोवेळी
पडले बाहेर घरट्यातून कधी काळी
हसत मज निरोप देता डोळे पुसतात वळुनी
मला म्हणे न रडता जा पाहु उडुनी
कोण मायेने पांघरेल मज
कोण म्हणेल ये बाळ कुशीत निज
मानते मी त्यानाच सर्वकाही
त्याजागी मजला दूजे कुणी नाही
भाव हे सारे आठवूनी
येते भरुनी पाणी नयनीं
प्रत्येक जन्मी मिळो मज हेच पप्पा
एकच प्रार्थिते तुज देवबाप्पा ! ! !
. . . . सौ. राखी हिरेमठ . . जुन १९९४
असतील जगात जन्मदाते कित्येक
पप्पा माझे आहेत लाखात एक
न भेद केला कधी मुला मुलीचा
प्रत्येक भाव जाणिला माझ्या मनिचा
सवंगडी म्हणुनी मजसवे खेळले
सखिसारखे हितगुज ग केले
जीवनी खचले मी कित्येक वेळा
जवळी मज केले म्हणुनी
बाळा
जेव्हा मज संकटांनी घेरले
जावुनि त्यांच्या कुशीत निजले
दिला मग तेव्हा त्यानी उबारा
दुसरा काय पिल्लाला हवा आसरा
पिल्लू ग मी त्यांचे चिमुकले
पंखांखाली मायेच्या भय सम्पले
म्हणतात मज आता ते मार भरारी
सोडूनि कसे जावे शल्य हेच उरी
घरट्याकडे नजर जाई वेळोवेळी
पडले बाहेर घरट्यातून कधी काळी
हसत मज निरोप देता डोळे पुसतात वळुनी
मला म्हणे न रडता जा पाहु उडुनी
कोण मायेने पांघरेल मज
कोण म्हणेल ये बाळ कुशीत निज
मानते मी त्यानाच सर्वकाही
त्याजागी मजला दूजे कुणी नाही
भाव हे सारे आठवूनी
येते भरुनी पाणी नयनीं
प्रत्येक जन्मी मिळो मज हेच पप्पा
एकच प्रार्थिते तुज देवबाप्पा ! ! !
. . . . सौ. राखी हिरेमठ . . जुन १९९४
मैत्री म्हणजे काय?
मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे प्रेम
प्रेमानं प्रेमावर साधलेला अचूक नेम
मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री नाते खास
आनंद, जिव्हाळ्याचा तो एक घास सुग्रास
मैत्री म्हणजे कोणत्याही नात्यापेक्षा मोठे
मैत्रीशिवाय मित्राने जावे तरी कोठे
मैत्री म्हणजे अधिकार, मैत्री म्हणजे हक्क
अतुट असते नाते असते बंधन पक्कं
मैत्री म्हणजे माझा आवडता विषय आहे
मैत्री विषय आहे म्हटल्यावर बोलणे भाग आहे
मैत्रीचा हात म्हणजे खात्रीची ठेव
मैत्री अतूट असताना का वाटावे भेव
आईशी सुध्दा असु शकते मैत्री, असु शकते सुध्दा वडिलांशी
बंधन कुठे असते नात्याचे मैत्रीपाशी
मनोमेघ
मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे प्रेम
प्रेमानं प्रेमावर साधलेला अचूक नेम
मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री नाते खास
आनंद, जिव्हाळ्याचा तो एक घास सुग्रास
मैत्री म्हणजे कोणत्याही नात्यापेक्षा मोठे
मैत्रीशिवाय मित्राने जावे तरी कोठे
मैत्री म्हणजे अधिकार, मैत्री म्हणजे हक्क
अतुट असते नाते असते बंधन पक्कं
मैत्री म्हणजे माझा आवडता विषय आहे
मैत्री विषय आहे म्हटल्यावर बोलणे भाग आहे
मैत्रीचा हात म्हणजे खात्रीची ठेव
मैत्री अतूट असताना का वाटावे भेव
आईशी सुध्दा असु शकते मैत्री, असु शकते सुध्दा वडिलांशी
बंधन कुठे असते नात्याचे मैत्रीपाशी
मनोमेघ
Tuesday, 7 July 2015
सरीवर सर ....
सरीवर सर ....
दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....
तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल ! उतू गेले मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....
थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर .... सरीवर सर ....
उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल .... गेले जल .... झाले जल आरपार
सरीवर सर .... सरीवर सर ....
अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....
संदीप खरे
दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....
तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल ! उतू गेले मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....
थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर .... सरीवर सर ....
उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल .... गेले जल .... झाले जल आरपार
सरीवर सर .... सरीवर सर ....
अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....
Thursday, 2 July 2015
तुझ असे सजणे..
तुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे..
काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..
का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..
तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...
दंग होई कुणी असा तुझा साज..
मखमली गालाला नथनीचा बाज..
किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..
पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..
भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..
पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..
ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..
जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..
तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..
जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..
त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..
अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी.
काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..
का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..
तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...
दंग होई कुणी असा तुझा साज..
मखमली गालाला नथनीचा बाज..
किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..
पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..
भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..
पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..
ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..
जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..
तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..
जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..
त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..
अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी.
Wednesday, 1 July 2015
| बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल |
" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल |
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल ||१ ||
माता विठ्ठल, पिता विठ्ठल |
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल ||२ ||
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल |
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ||२ ||
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला |
म्हणुनी कळीकाळा पाड नाही ||४ ||
" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल |
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल ||१ ||
माता विठ्ठल, पिता विठ्ठल |
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल ||२ ||
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल |
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ||२ ||
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला |
म्हणुनी कळीकाळा पाड नाही ||४ ||
" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "
Tuesday, 30 June 2015
तुझी आठवण येताना
"तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा देउन जाते..
तुझ्या पैजणांची रुणझुण
कानांमध्ये दाटुन येते,
मी मिटुन घेतो डोळे तेव्हा
तु मिठीत हळुवार भेटुन जाते...
स्वप्नांतले जगणे माझे
वास्तवाचे भान सुटुन जाते,
मनात तुझ्या आठवांचे
पुन्हा रान पेटुन येते....
तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते..,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा... देउन जाते....."
' या आईला काही कळतच नाही...'
' या आईला काही कळतच नाही...'
या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही
या आईला ना काही कळतच नाही
दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला ना काही कळतच नाही
कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
नमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही
या आईला ना काही कळतच नाही
शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू... नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
मी चित्रं काढलेलं... लक्ष देत नाही
या आईला ना काही कळतच नाही
होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला ना काही कळतच नाही
दमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला आवडत नाही
पण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही...
Being a mother is one of the highest paid jobs in the world since the payment is PURE LOVE . You must appreciate..............
जुने फोटो
जुने फोटो
किती छान वाटते
जुने फोटो बघायला .
मलाही आवडते
स्वताला फोटोत
बंद करून घ्यायला
कधीही बघा
वय कसे तेच असते
ह्या सरत्या वयातही
आपले जुने वय
आपल्यालाच
नव्याने भेटत असते
मी बघत बसतो
बालपणीचे फोटो
ती खिडकी तशीच
नि
आभाळात ढग
अजूनही बरसत नसतो
वाटत रहाते
उघड्या दारातून
आई कधीपण येईल
अभ्यास झाला का म्हणून
नुसतेच डोळ्याने विचारीन
कधी कधी
फोटो बघताना
ती दिसून जाते
आणि तिची आठवण
शप्पत
ओली ओली होऊन येते
जुने फोटो बघताना
माझे असेच होऊन जाते
वर्तमान काळ हरवून जातो
अन
मन फुलपाखरू होऊन
झुलून जाते
प्रकाश
किती छान वाटते
जुने फोटो बघायला .
मलाही आवडते
स्वताला फोटोत
बंद करून घ्यायला
कधीही बघा
वय कसे तेच असते
ह्या सरत्या वयातही
आपले जुने वय
आपल्यालाच
नव्याने भेटत असते
मी बघत बसतो
बालपणीचे फोटो
ती खिडकी तशीच
नि
आभाळात ढग
अजूनही बरसत नसतो
वाटत रहाते
उघड्या दारातून
आई कधीपण येईल
अभ्यास झाला का म्हणून
नुसतेच डोळ्याने विचारीन
कधी कधी
फोटो बघताना
ती दिसून जाते
आणि तिची आठवण
शप्पत
ओली ओली होऊन येते
जुने फोटो बघताना
माझे असेच होऊन जाते
वर्तमान काळ हरवून जातो
अन
मन फुलपाखरू होऊन
झुलून जाते
प्रकाश
Thursday, 25 June 2015
गोष्ट वेड्या पावसाची
गोष्ट वेड्या पावसाची
नाही राजा-राणीची
नाही मांजर-मनीची
ऐका सांगते तुम्हा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची
मेघांतून एकटाच आपुला
पाऊस रोज फिरत असे
कुणीच नाही खेळायला
हेच त्याचं दुःख असे
पळावया हे अथांग आकाश
पण पकडायला कुणीच नसे
गगनाच्या या अफाट जगात
जो तो आपुला मग्न असे
अशाच एका सायंकाळी
ठरविले त्या पावसाने
अंबरी नाही कुणीच सोबती
जाईन म्हणतो धरतीकडे
अंगावर काळा कोट घालून
ऐटीत तो तयार झाला
ढगांच्या रथात स्वार होऊन
दौडत दौडत पृथ्वीवर निघाला
पृथ्वीवर आगमन होताच त्याने
नद्या-सागरांना मिठी मारली
शेतात पिकांबरोबर डोलताना
हास्याची गोड कळी खुलली
फुले हसली, पाने डोलली
निर्झर खळखळून धावू लागले
या डोंगरावरून त्या डोंगरावर
पावसाचे खेळ सुरूच राहिले
असा हा खुळा पाऊस
मनसोक्त खेळून गेला
जाता जाता धरतीचेही
मन तृप्त करून गेला
अशीच झाली होती मैत्री
या पावसाची धरतीशी
कशी वाटली सांगा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची
~सुप्रिया गावडे, डोंबिवली
नाही मांजर-मनीची
ऐका सांगते तुम्हा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची
मेघांतून एकटाच आपुला
पाऊस रोज फिरत असे
कुणीच नाही खेळायला
हेच त्याचं दुःख असे
पळावया हे अथांग आकाश
पण पकडायला कुणीच नसे
गगनाच्या या अफाट जगात
जो तो आपुला मग्न असे
अशाच एका सायंकाळी
ठरविले त्या पावसाने
अंबरी नाही कुणीच सोबती
जाईन म्हणतो धरतीकडे
अंगावर काळा कोट घालून
ऐटीत तो तयार झाला
ढगांच्या रथात स्वार होऊन
दौडत दौडत पृथ्वीवर निघाला
पृथ्वीवर आगमन होताच त्याने
नद्या-सागरांना मिठी मारली
शेतात पिकांबरोबर डोलताना
हास्याची गोड कळी खुलली
फुले हसली, पाने डोलली
निर्झर खळखळून धावू लागले
या डोंगरावरून त्या डोंगरावर
पावसाचे खेळ सुरूच राहिले
असा हा खुळा पाऊस
मनसोक्त खेळून गेला
जाता जाता धरतीचेही
मन तृप्त करून गेला
अशीच झाली होती मैत्री
या पावसाची धरतीशी
कशी वाटली सांगा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची
~सुप्रिया गावडे, डोंबिवली
Tuesday, 23 June 2015
Monday, 22 June 2015
!!एक दिवसाचा पांडुरंग ....
!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !!
"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"
( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )
पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "
(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"
(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)
रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"
गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........
पांडुरंग पुढे म्हणतो .........
अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.
त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"
तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.
"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"
( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )
पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "
(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"
(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)
रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"
गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........
पांडुरंग पुढे म्हणतो .........
अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.
त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"
तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.
शाळा.. आणि पावसाळा..
शाळा.. आणि पावसाळा..
दोघ आसपास एकत्रच शुरु व्हायचे..
नविन रेनकोट, रंगित छत्रि घेउन शाळेत जाताना कितिहि हुशार असले, तरी साले सगळेच मित्र वेडे वाटायचे..
रस्त्यावरच पाण्याच डबकं मस्ती करायचा एक बहाणाच वाटायचा.. गमबूटचा उपयोग चालण्यासाठि कमी, पाणी भरून मस्ती करण्यासाठि जास्त व्हायचा..
लहानपणीची शाळा पावसाळा खुप छान होतं..
आता सगळे मोठे झाले, पैशाच्या पावसात पाण्याच्या पावसातली मैत्री वाहुन गेली..
पण पाऊस अजून पडतो आहे, फक्त माझा प्रत्येक मित्र एकटा भिजतो आहे...
दोघ आसपास एकत्रच शुरु व्हायचे..
नविन रेनकोट, रंगित छत्रि घेउन शाळेत जाताना कितिहि हुशार असले, तरी साले सगळेच मित्र वेडे वाटायचे..
रस्त्यावरच पाण्याच डबकं मस्ती करायचा एक बहाणाच वाटायचा.. गमबूटचा उपयोग चालण्यासाठि कमी, पाणी भरून मस्ती करण्यासाठि जास्त व्हायचा..
लहानपणीची शाळा पावसाळा खुप छान होतं..
आता सगळे मोठे झाले, पैशाच्या पावसात पाण्याच्या पावसातली मैत्री वाहुन गेली..
पण पाऊस अजून पडतो आहे, फक्त माझा प्रत्येक मित्र एकटा भिजतो आहे...
भिजून गेला वारा...
भिजून गेला वारा...
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना जरा
झिम्माड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले
श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतूर झाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना जरा
स्पर्शात वारे, निळे पिसारे, आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघांत जग हे न्हाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिटून डोळे घे ना जरा
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना जरा
झिम्माड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले
श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतूर झाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना जरा
स्पर्शात वारे, निळे पिसारे, आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघांत जग हे न्हाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिटून डोळे घे ना जरा
Sunday, 21 June 2015
Friday, 19 June 2015
चहा…! की Daru…!!
मला हे comparison आवडले.
चहा…! की Daru…!!
चहा म्हणजे उत्साह..,
Daru म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..,
Daru म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..,
Daru अक्षरशः निवांत...!
चहा म्हणजे झकास..,
Daru म्हणजे वाह मस्त...!!
चहा म्हणजे कथासंग्रह...,
Daru म्हणजे कादंबरी...!
चहा नेहमी मंद दुपार नंतर...,
Daru एक धुंद संध्याकाळी...!!
चहा चिंब भिजल्यावर...,
Daru ढग दाटुन आल्यावर...!
चहा = discussion..,
Daru = conversation...!!
चहा = living room....,
Daru = waiting room...!
चहा म्हणजे उस्फूर्तता...,
Daru म्हणजे उत्कटता...!!
चहा = धडपडीचे दिवस...
Daru = धडधडीचे दिवस!...!
चहा वर्तमानात दमल्यावर...,
Daru भूतकाळात रमल्यावर...!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे...,
Daru पिताना स्वप्न रंगवायची...!!!
चहा…! की Daru…!!
चहा म्हणजे उत्साह..,
Daru म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..,
Daru म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..,
Daru अक्षरशः निवांत...!
चहा म्हणजे झकास..,
Daru म्हणजे वाह मस्त...!!
चहा म्हणजे कथासंग्रह...,
Daru म्हणजे कादंबरी...!
चहा नेहमी मंद दुपार नंतर...,
Daru एक धुंद संध्याकाळी...!!
चहा चिंब भिजल्यावर...,
Daru ढग दाटुन आल्यावर...!
चहा = discussion..,
Daru = conversation...!!
चहा = living room....,
Daru = waiting room...!
चहा म्हणजे उस्फूर्तता...,
Daru म्हणजे उत्कटता...!!
चहा = धडपडीचे दिवस...
Daru = धडधडीचे दिवस!...!
चहा वर्तमानात दमल्यावर...,
Daru भूतकाळात रमल्यावर...!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे...,
Daru पिताना स्वप्न रंगवायची...!!!