Tuesday, 28 April 2015

आसू...

आसू...
#MarathiKavitaBlog

Monday, 27 April 2015

वेध...

वेध...
#MarathiKavitaBlog

Wednesday, 22 April 2015

संधी...

संधी...
#MarathiKavitaBlog
संधी सुविचार‬

Tuesday, 21 April 2015

अक्षय तृतीया महत्व......

अक्षय तृतीया महत्व......
ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे
वैशाख शुद्ध तृतीया
येते. *अक्षय्य तृतीया* हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी
एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात
 खीर
आंब्याचे पन्हे
किंवा चिंचोणी
, पापड
, कुरडया
इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घटब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा
वश्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.

अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
* शुभ कार्ये या दिवशी होतात.
* श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.
या दिवशी बद्रिधामावर बद्रिनारायणाच्या मंदिरात प्रथम प्रवेश मिळतो.वृंदावनात कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजेपण उघडले जातात. ही विष्णूचा एक अवतार समजल्या जाणाऱ्या परशुरामाची जन्मतिथी आहे .......
आपना सर्वाना अक्षय तृतियाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....


#MarathiKavitaBlog

तुला विसरणारा मी नाही ...

#MarathiKavitaBlog
तुला विसरणारा मी नाही ...

लग्न ...

लग्न ...
#MarathiKavitaBlog

Friday, 17 April 2015

तू क्षितिजा सारखा...
जवळ यायला लागलंकी लांब राहतोस
आणि यायचं थांबलं की....
आशेने पाहतोस .
~चंद्रशेखर गोखले
#MarathiKavitaBlog

Wednesday, 15 April 2015

Appraisal !

सध्या बहुतेक जणांच्या Offices मध्ये चर्चे चा विषय Appraisal !
#MarathiKavitaBlog

महाभारतातील एक गोष्ट

सुप्रभात
महाभारतातील ही गोष्ट आहे.
नक्की वाचा
पांडवांचा युद्धात विजय झाला. पूर्वी आपल्या हातून
झालेली पापे नाहीशी
करण्यासाठी व
मनःशुध्दीसाठी त्यांनी
तीर्थस्नानांची यात्रा करण्याचे
ठरविले. श्रीकृष्णाला सांगण्यासाठी व
त्याची संमती घेण्यासाठी सर्व
पांडव त्याच्याकडे गेले.
श्रीकृष्ण म्हणाला, "जात आहात तर जा. परंतु
मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची
फांदी देतो.
तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तिला पण स्नान घाला."
पांडव त्यानंतर भारतातील सर्व
तीर्थक्षेत्रांवर स्नान
करण्यासाठी तीर्थयात्रेला गेले.
तीर्थयात्रेहून परत
आल्यावर सर्व पांडवांनी
श्रीकृष्णाची भेट घेतली व
त्यांची फांदी त्याला परत करत ते म्हणाले,
"आठवणीने सर्व क्षेत्रांवर तिला स्नान घातले."
श्रीकृष्णाने सुरीने फांदीचे
तुकडे करुन सर्वांना खावयास
दिले व म्हणाला, "प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा."
सर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड एकदम कसेसेच
केले. कारण प्रसादाची चव कडूच होती.
श्रीकृष्णाने
विचारले, "सर्व तीर्थक्षेत्रांमधे स्नान
करुनही कडूनिंबाची चव गोड
झाली का ?" "कशी होईल ?
स्नान घालून बाह्य बदल होईल.
आतला कडूपणा कसा जाईल?"
धर्मराजाने प्रश्न केला.
श्रीकृष्ण म्हणाला, "तेच समजावून
सांगण्यासाठी मी ही
डहाळी तुमच्याबरोबर दिली
होती.
तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल. परंतु
मनशुध्दी किंवा आत्मशुध्दी
कशी होईल? त्यांचा संबंध
सदाचरणाशी, सदगुणांशी आहे...
बोध -मनशुध्दीसाठी ज्ञान, सदाचार, सेवा,
सत्त्वगुण
यांनी सुस्नात व्हावे तीर्थस्नानांने नव्हे.

#MarathiKavitaBlog

Tuesday, 14 April 2015

आंबेडकर जयंती निम्मित Google Doodle

भारतीय राज्यघटनेचे जनक बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 वी जयंती चिन्हांकित करण्यासाठी , Google ने जगभरातील 8 देशांमध्ये त्याच्या मुख्यपृष्ठांवर Doodle पोस्ट केला आहे.
अर्जेंटिना, चिली, भारत , आयर्लंड , पेरू, पोलंड , स्वीडन आणि युनायटेड किंगडम या देशांत हे डॊद्ले दिसेल. बाबासाहेब आंबेडकरांचे हे डूडल तीन खंड ओलांडून Google च्या देश-विशिष्ट मुख्य पृष्ठांवर दृश्यमान आहे .
#MarathiKavitaBlog


बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 वी जयंती

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील, 
तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल...
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
भारतीय राज्यघटनेचे जनक बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 वी जयंती निम्मित विनम्र अभिवादन !
#MarathiKavitaBlog

इंटरकास्ट लग्न...

इंटरकास्ट लग्न...
#MarathiKavitaBlog

Sunday, 12 April 2015

Friday, 10 April 2015

घर

घर हे दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवल
तर दुसऱ्याने आवरायचं
-चंद्रशेखर गोखले
#MarathiKavitaBlog

विसर ...

तु विचारलेस काल मला
अजून ओळखतेस माझ्या आवाजाला
तुच सांग आपल्या ह्रदयाचे ठोके
विसरतात का कधी स्वतःला ...
#MarathiKavitaBlog

Wednesday, 8 April 2015

आठवणी ...

आठवणी ...
#MarathiKavitaBlog

Monday, 6 April 2015

पहिले प्रेम...

पहिले प्रेम...
#MarathiKavitaBlog

Wednesday, 1 April 2015

तू दिलेल्या दुः खाने

 तू दिलेल्या दुः खाने
मला बरेचं काही शिकवले
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले…
#MarathiKavitaBlog

मागू नकोस

 मागू नकोस

मागू नकोस रे तू
आपण जगलेले ते बेभान क्षण
जरा कुरवाळू दे ना मला
ती विलक्षण आठवण

धुंद पावसातली ती
ओली गच्च संध्याकाळ
एकाच छत्रीतून केलेली
ती नशीली वाटचाल

त्या मुसळधार पावसाच्या
बेफाम सरी
अन तुझ्या सहवासाची
ती गोड शिरशिरी

सारं कसं भारलेलं
मंत्रमुग्ध झालेलं
मौनानंच जणू
सारं काही बोललेलं

माझ्या मनात कायमचा
साठवू दे रे तुला
दृष्टीआड होण्या आधी
सारं पुन्हा जगू दे रे मला

-जयश्री अंबासकर

#MarathiKavitaBlog

आठवण आली तुझी की...

 आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासावीस होतं
मग त्याच आठवणींना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलंय माझं ते सौख्य...
पण तरीही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....

-विशाल...ग़ारवा
#MarathiKavitaBlog