Thursday, 18 December 2014
Wednesday, 17 December 2014
Monday, 15 December 2014
आई
आई
आई हे ईश्वराचे
पवित्र-पावन नाव
माया,प्रेम,आपुलकी
व वात्सल्याने गजबजलेले गाव.
आई हे देवासमोर
सतत जळणारी निरांजन,
जगातील सर्वात मोल्यवान
कधीही न संपणारे धन.
आई हे प्रेम देणारा
अमृताने भरलेला झरा,
मनाच्या जखमेवर
मायेची फुंकर घालणारा वारा.
आई हे वात्सल्याने
काठोकाठ भरलेला सागर,
रसाळ मधुर वाणीने भरलेली घागर.
आई हे मृत्यूवर
मात करणारे अमृत,
सदा आशीर्वाद देणारा
देवतुल्य हस्त.
#MarathiKavitaBlog
आई हे ईश्वराचे
पवित्र-पावन नाव
माया,प्रेम,आपुलकी
व वात्सल्याने गजबजलेले गाव.
आई हे देवासमोर
सतत जळणारी निरांजन,
जगातील सर्वात मोल्यवान
कधीही न संपणारे धन.
आई हे प्रेम देणारा
अमृताने भरलेला झरा,
मनाच्या जखमेवर
मायेची फुंकर घालणारा वारा.
आई हे वात्सल्याने
काठोकाठ भरलेला सागर,
रसाळ मधुर वाणीने भरलेली घागर.
आई हे मृत्यूवर
मात करणारे अमृत,
सदा आशीर्वाद देणारा
देवतुल्य हस्त.
#MarathiKavitaBlog
Thursday, 11 December 2014
Tuesday, 9 December 2014
Monday, 8 December 2014
Friday, 5 December 2014
Thursday, 4 December 2014
Wednesday, 3 December 2014
|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
आज पहाटे जाग येता
डोळे अर्धे निजलेले
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले
बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा
रवीकिरणांना शोधित शोधित उधळीत जाई पर्णपिसारा
मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल
|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
#MarathiKavitaBlog
डोळे अर्धे निजलेले
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले
बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा
रवीकिरणांना शोधित शोधित उधळीत जाई पर्णपिसारा
मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल
|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
#MarathiKavitaBlog
Monday, 1 December 2014
Friday, 28 November 2014
Wednesday, 26 November 2014
Tuesday, 25 November 2014
Friday, 21 November 2014
Wednesday, 19 November 2014
Sunday, 16 November 2014
Friday, 24 October 2014
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही...!!
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
आई, रात्र अधिकच झालीय,
दिव्यातल तेल संपत आलय,
बाहेर फटाक्यांनी जोर धरलाय,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे दिव्यांचा झगमगाट,
कोठे फराळाचा सुवास,
आपल्या घरात तर ऐक दाना ही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे नव्या कपड्याच्या घड्या,
बाहेर उचं उचं माड्या,
आपल्या झोपडीला अजून दारही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे नोटांची पुजा,
तर कोठे सोन्याचे हार,
तुझ्या गळ्यात सोन्याचा ऐक मणी नाही,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही...!!
(( दिवाळीत कपडे फटाके तर सरवच घेतात पण एक दिवाळी अशी Celebrate करा की ती तुमच्या व दुसर्यांचा लक्षात राहिल ))
#MarathiKavitaBlog
आई, रात्र अधिकच झालीय,
दिव्यातल तेल संपत आलय,
बाहेर फटाक्यांनी जोर धरलाय,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे दिव्यांचा झगमगाट,
कोठे फराळाचा सुवास,
आपल्या घरात तर ऐक दाना ही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे नव्या कपड्याच्या घड्या,
बाहेर उचं उचं माड्या,
आपल्या झोपडीला अजून दारही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे नोटांची पुजा,
तर कोठे सोन्याचे हार,
तुझ्या गळ्यात सोन्याचा ऐक मणी नाही,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही...!!
(( दिवाळीत कपडे फटाके तर सरवच घेतात पण एक दिवाळी अशी Celebrate करा की ती तुमच्या व दुसर्यांचा लक्षात राहिल ))
#MarathiKavitaBlog
Thursday, 23 October 2014
Wednesday, 22 October 2014
आठवणीतली दिवाळी
आठवणीतली दिवाळी
एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु
झालेली असायची. दसर्यापासूनच
थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.
दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.
किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे
हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर
पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून
बुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड'
राखण्यात !!
फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग
मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात
सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे
रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.
फटक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,
लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,
नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.
एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून
छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात
गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान
चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच
काय ती दारू माहिती तेव्हाची !!
'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभंगस्नानाला उठायचं
आहे' - आजी सांगायची. पण इथे झोप
कोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश,
दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.
न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून
अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.
तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान
वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.
मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात
मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं
वाटायचं.
देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे
अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते
गोठायचं नाही म्हणून बर वाटायचं.
मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो.
फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून.
पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते. दिवस हळूहळू
उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढाजास्त
आनंद व्हायचा त्याचा.
आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं
शेवटचं? लहान होवून. छोट्या गोष्टीत रमून. निरागसपणे.
अशी सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये
का आपण खूप पुढे आलोय?
ह्या दिवाळीत मी पुन्हा असं सगळं जगणार आहे. वय
नाही पण मन लहान करून पुन्हा मागे जाणार आहे.
बंबाचा धूर डोळ्यात घालवणार आहे. मोती साबण
आणि उटन अंगभर चोळून घेणार आहे. टक्कल
पडलेल्या डोक्याला जास्मिनच तेल लावणार आहे.
देवघरातल्या मंद प्रकाशात हि प्रार्थना करणार आहे
कि 'हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.' !!
उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ
झाली !!
#MarathiKavitaBlog
एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु
झालेली असायची. दसर्यापासूनच
थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.
दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.
किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे
हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर
पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून
बुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड'
राखण्यात !!
फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग
मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात
सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे
रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.
फटक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,
लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,
नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.
एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून
छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात
गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान
चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच
काय ती दारू माहिती तेव्हाची !!
'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभंगस्नानाला उठायचं
आहे' - आजी सांगायची. पण इथे झोप
कोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश,
दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.
न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून
अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.
तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान
वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.
मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात
मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं
वाटायचं.
देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे
अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते
गोठायचं नाही म्हणून बर वाटायचं.
मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो.
फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून.
पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते. दिवस हळूहळू
उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढाजास्त
आनंद व्हायचा त्याचा.
आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं
शेवटचं? लहान होवून. छोट्या गोष्टीत रमून. निरागसपणे.
अशी सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये
का आपण खूप पुढे आलोय?
ह्या दिवाळीत मी पुन्हा असं सगळं जगणार आहे. वय
नाही पण मन लहान करून पुन्हा मागे जाणार आहे.
बंबाचा धूर डोळ्यात घालवणार आहे. मोती साबण
आणि उटन अंगभर चोळून घेणार आहे. टक्कल
पडलेल्या डोक्याला जास्मिनच तेल लावणार आहे.
देवघरातल्या मंद प्रकाशात हि प्रार्थना करणार आहे
कि 'हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.' !!
उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ
झाली !!
#MarathiKavitaBlog
Tuesday, 21 October 2014
Monday, 20 October 2014
आज वसु बारस...
आज वसु बारस...
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
http://www.baalpan.com/festival/vasubaras#sthash.X65KUMqy.dpuf
#MarathiKavitaBlog
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
http://www.baalpan.com/festival/vasubaras#sthash.X65KUMqy.dpuf
#MarathiKavitaBlog
Friday, 17 October 2014
तुझ्या भेटीची ओढ
तुझ्या भेटीची ओढ
तुझ्या भेटीची ओढ
प्रत्येक भेटी नंतर वाढतच जाते
मला फक्त एकाच सांग....
सांग न असे का होते
तुझ्याशी बोलताना काळातच नाही
वेळ कसा निघून जातो
क्षण हा येथेच थांबवा
मनोमन हेच वाटत राहत
वेड मन माझं
त्याला समजू किती
तू येऊन गेलास तरीही
वात पाहत राही तुझीच
क्षणाचाही दुरावा
सांग का वाटतो युगासारखा?
कल्पनेतही आहे अश्यक्य
आता जगणे तुझ्या विना.....
"श्वेता पोहनकर"
#MarathiKavitaBlog
तुझ्या भेटीची ओढ
प्रत्येक भेटी नंतर वाढतच जाते
मला फक्त एकाच सांग....
सांग न असे का होते
तुझ्याशी बोलताना काळातच नाही
वेळ कसा निघून जातो
क्षण हा येथेच थांबवा
मनोमन हेच वाटत राहत
वेड मन माझं
त्याला समजू किती
तू येऊन गेलास तरीही
वात पाहत राही तुझीच
क्षणाचाही दुरावा
सांग का वाटतो युगासारखा?
कल्पनेतही आहे अश्यक्य
आता जगणे तुझ्या विना.....
"श्वेता पोहनकर"
#MarathiKavitaBlog
Thursday, 16 October 2014
Wednesday, 15 October 2014
Tuesday, 14 October 2014
रुसवा
रुसवा
रुसण्यात काय हर्ष आहे हसण्यात ही फसून जा
गुलाम आहे तुझाच मी राणी पुन्हा बनून जा
आवाज तुझा स्पर्शासमान मुक्याने कसा कळावा
पतंग हा एकटाच ज्योतीविना कसा जळावा
लाजेच्या त्या लालीत मला एकदा भिजवून जा
विरहाच्या या क्षणांना रुसण्याचे बंधन कशाला
एकाकी या जीवाला जगण्याचे कुंपण कशाला
एकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा
जेडी
#MarathiKavitaBlog
रुसण्यात काय हर्ष आहे हसण्यात ही फसून जा
गुलाम आहे तुझाच मी राणी पुन्हा बनून जा
आवाज तुझा स्पर्शासमान मुक्याने कसा कळावा
पतंग हा एकटाच ज्योतीविना कसा जळावा
लाजेच्या त्या लालीत मला एकदा भिजवून जा
विरहाच्या या क्षणांना रुसण्याचे बंधन कशाला
एकाकी या जीवाला जगण्याचे कुंपण कशाला
एकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा
जेडी
#MarathiKavitaBlog
Thursday, 9 October 2014
Tuesday, 7 October 2014
Monday, 6 October 2014
Saturday, 4 October 2014
चहा ... की कॉफी...
मला हे comparison आवडले.
चहा…! की कॉफी…!!
चहा म्हणजे उत्साह..,
कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..,
कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..,
कॉफी अक्षरशः निवांत...!
चहा म्हणजे झकास..,
कॉफी म्हणजे वाह मस्त...!!
चहा म्हणजे कथासंग्रह...,
कॉफी म्हणजे कादंबरी...!
चहा नेहमी मंद दुपार नंतर...,
कॉफी एक धुंद संध्याकाळी...!!
चहा चिंब भिजल्यावर...,
कॉफी ढग दाटुन आल्यावर...!
चहा = discussion..,
कॉफी = conversation...!!
चहा = living room....,
कॉफी = waiting room...!
चहा म्हणजे उस्फूर्तता...,
कॉफी म्हणजे उत्कटता...!!
चहा = धडपडीचे दिवस...,
कॉफी = धडधडीचे दिवस!...!
चहा वर्तमानात दमल्यावर...,
कॉफी भूतकाळात रमल्यावर...!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे...,
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची...!!!
#MarathiKavitaBlog
Thursday, 2 October 2014
Wednesday, 1 October 2014
खरच काही मुले असतातच असे...
खरच काही मुले असतातच असे,.
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम
करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत
असून फ़क्त
तिच्यावरच प्रेम करणारे...
मुले असतातच असे,.
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात
पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
मुले असतातच असे,.
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून
तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...
खरच काही मुले असतातच असे,.
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील
स्वताला विसरून त्यात
आपले प्रेम शोधणार....
#MarathiKavitaBlog
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम
करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत
असून फ़क्त
तिच्यावरच प्रेम करणारे...
मुले असतातच असे,.
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात
पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
मुले असतातच असे,.
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून
तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...
खरच काही मुले असतातच असे,.
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील
स्वताला विसरून त्यात
आपले प्रेम शोधणार....
#MarathiKavitaBlog
Tuesday, 30 September 2014
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
असतेस जेव्हा तु माझ्याबरोबर
बेधुंद वागतो तेव्हा मी खरंतर
तु नसलीस की मग तुझ्या आठवनींना उधाण येई
तुझ्या आठवनीं सोबत
दिवस सरतो सहज पण ती कळोखी रात्र सरत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
दिवस उतरावा तसे तुझे
विचार मनात उतरतात
हळुच मग मनाच्या
हळव्या कोन्यातली नाजुक तार छेडतात
तुझ्या त्या विचारांनी मी मात्र घायाळ होई
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
एकटा वाटेवर चालतानाही
तुझी सोबत सतत जाणवी
मागे वळुण पाहताना
माझ्याच सावलीत मी नेहमीच तुझं चित्र पाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु समोर असल्यावर तुझ्या डोळ्यात
मी स्वत:चे प्रतीबिंब पाही
त्या प्रतीबींबातही मी तुझी साथ शोधण्याचा प्रयत्न करी
पण नेमकं तेव्हाच तु पापण्या मिटतेस
का ? गं अशी मला तु नेहमीच छळतेस
पण त्या छळण्याने मात्र कधीही त्रास होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु जवळ असल्यावर तुला मी स्पर्श करु पाही
तुला मी स्वत:च्या प्रेमळ मीठित घेउ पाही
पण देव जाणे का ? माझं कधी धाडसंच होत नाही
जवळ असुनही कसला हा दुरावा
आता खरच हे सगळ सहन होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
@सचिन काकडे
#MarathiKavitaBlog
असतेस जेव्हा तु माझ्याबरोबर
बेधुंद वागतो तेव्हा मी खरंतर
तु नसलीस की मग तुझ्या आठवनींना उधाण येई
तुझ्या आठवनीं सोबत
दिवस सरतो सहज पण ती कळोखी रात्र सरत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
दिवस उतरावा तसे तुझे
विचार मनात उतरतात
हळुच मग मनाच्या
हळव्या कोन्यातली नाजुक तार छेडतात
तुझ्या त्या विचारांनी मी मात्र घायाळ होई
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
एकटा वाटेवर चालतानाही
तुझी सोबत सतत जाणवी
मागे वळुण पाहताना
माझ्याच सावलीत मी नेहमीच तुझं चित्र पाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु समोर असल्यावर तुझ्या डोळ्यात
मी स्वत:चे प्रतीबिंब पाही
त्या प्रतीबींबातही मी तुझी साथ शोधण्याचा प्रयत्न करी
पण नेमकं तेव्हाच तु पापण्या मिटतेस
का ? गं अशी मला तु नेहमीच छळतेस
पण त्या छळण्याने मात्र कधीही त्रास होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु जवळ असल्यावर तुला मी स्पर्श करु पाही
तुला मी स्वत:च्या प्रेमळ मीठित घेउ पाही
पण देव जाणे का ? माझं कधी धाडसंच होत नाही
जवळ असुनही कसला हा दुरावा
आता खरच हे सगळ सहन होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
@सचिन काकडे
#MarathiKavitaBlog